मार्ग ताम्हाणे: येथील डॉ तात्यासाहेब नातू कला व वाणिज्य महाविद्यालय वतीने प्रतिवर्षी भरारी वार्षिक अंकाचे प्रकाशन केले जाते. या वर्षी देखील प्रकाशन समारंभ आयोजित केला होता. चिपळूण परिसरातील लेखक. पर्यटन व पर्यावरण अभ्यासक धीरज वाटेकर यांच्या हस्ते भरारी चे प्रकाशन करण्यात आले त्या प्रसंगी बोलताना धीरज वाटेकर यांनी कोरोना परिस्थितीत देखील महाविद्यालयाने आपली परंपरा सुरू ठेवून साहित्य सेवा केली असल्या बद्दल समाधान व्यक्त केले. सर्वांनी आपल्या अनुभवाचे लेखन केले तर आपल्या व इतरांच्या जीवनाला दिशा मिळण्याचे काम होते स्वतःला आनंद मिळतो असे मत व्यक्त केले. प्रारंभी प्रा राजश्री कदम यांनी संपादक म्हणून आलेले अनुभव सांगितले करोना काळातील आपले अनुभव लिहिणे लिहून घेणे व प्रकाशित करणे हे काम आव्हानात्मक असले तरीही सर्वांनी मिळून केले असल्याने शक्य झाले असल्याचे मत व्यक्त केले. मार्ग ताम्हाणे एज्युकेशन सोसायटी उपाध्यक्ष श्री जयसिंगराव मोरे यांनी आपले मत व्यक्त करताना लिखाणाचे महत्त्व विशद केले आपल्या मनातील विचार भावना लिहून ठेवल्यास नंतर वाचन केले तर सुखद अनुभव येतात या साठी वाचन करावे असे आवाहन केले प्राचार्य विजयकुमार खोत. कृष्णकांत चव्हाण यांनी देखील आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा राजश्री कदम यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा डॉ सुरेश सुतार यांनी मानले .
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
गोरेगाव येथे श्री स्वामी पुण्यतिथी उत्साहात संपन्न!
मुंबई : गोरेगाव (पूर्व) येथील, अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित) व नागरी निवारा परिषद गणेश...
-
मुंबई (प्रतिनिधी ) राज्य गुणवंत कामगार असोसिएशन. चे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महानंदा डेअरी.गोरे...
-
मुंबई दि. २० (अधिराज्य) प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली १९८४ साली पक्षाची जी पुनर्बांधणी झाली तेव्हापासून बाळासाहेबांच्या ...
-
मुंबई(उदय दणदणे) महाराष्ट्रातील लोककला परंपरेतील कोकणातील कलगी तुरा लोककला व लोककलावंतांची मातृसंस्था- "कलगी तुरा समाज उन्न...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा