मुंबई, दादासाहेब येंधे : सर्वांसाठी लोकल सुरू करण्याची मागणी होत असली तरी १५ डिसेंबरनंतरच त्याबाबत विचार होणार आहे. अशी माहिती मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी माध्यमांशी बोलताना तीन ते चार आठवड्यानंतर लोकल सर्वांसाठी खुली करण्याचा विचार केला जाऊ शकतो, सांगितले.
रोजच्या व्यवहारांना मिळालेली परवानगी आणि थंडीमुळे कोविड चा संसर्ग वाढण्याच्या शक्यतेमुळे लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी तूर्तास सुरू होणार नाही. राज्याच्या टास्क फोर्सने दिवाळीच्या तीन आठवड्यांनंतर लोकल सेवेबाबत निर्णय घेण्याची शिफारस केली आहे. परिस्थितीचा अंदाज घेऊन निर्णय घेण्यात येईल असे इक्बाल सिंह यांनी स्पष्ट केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा