आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, २६ नोव्हेंबर, २०२०

एन.जी पार्क येथील मुलांनी उभारलेल्या तोरणा किल्ला बघण्यास नागरिकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद

 

मुंबई(समीर खाडिलकर/शांत्ताराम गुडेकर  )

        दिवाळीची चाहूल लागताच लहानग्यांपासून ते अगदी थोरामोठ्यांपर्यंत सर्व जण अनेक जण फटाके फोडण्याचे फराळावर ताव मारण्याची त्यासोबत किल्ले बांधण्याचे वेध लागते. दिवाळी निमित्ताने किल्ले बांधण्याची स्पर्धा देखील आयोजित केली जाते. दिवाळी किल्ले बांधण्याची परंपरा आजही जीवत आहे.  मुंबई उपनगरात ठिकठिकाणी किल्ले बांधण्यात आले आहे.दिवाळी म्हणजेच आनंद मांगल्याचा आणि रोषणाईचा सण परंतु या सोबतच आपली प्राचीन परंपरा प्राचीन इतिहास जपण्याचा प्रयत्न देखील या सणाच्या माध्यमातून होताना आपल्याला दिसून येत आहे. खरे तर दिवाळीच्या काळात ज्या सुट्ट्या पडतात त्या वेळेला लहान मुलांना वेध लागतात ते किल्ले बनवायचे आणि सुट्टीत फावल्या वेळेत ही मुले एकत्र जमून किल्ले बनवताना ठीक ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत या महाराष्ट्राची शहान असलेले जंजिरा, शिवनेरी, राजगड आदी किल्ले बच्चेकंपनी सकारतात.

             मुंबईतील बोरीवली पूर्व विभागातील  एन.जी पार्क संकुल येथेही तोरणा किल्ला उभारण्यात आला होता. शिवाजी महाराज यांचा इतिहास व गडकिल्ले यांची सखोला माहीती येणाऱ्या पिढिला मिळावी शिवाय आपली संस्कृती पिढ्यान पिढ्या जपली जावी हा एकमेव उद्देश किल्ले उभारण्यामागचा असतो.एन.जी पार्क संकुल येथील तोरणा किल्ला उभारण्यासाठी तेजश सोड्ये,हेमंत नेवगी,हेमंत गुप्ता,शुभम आरेकर,दिपक सोड्ये,सुशील सिंह,हर्षद निकुले,हर्षल हिलेकर,आदेश आनगरे,संदेश डोके,यश गोळे यांनी विशेष परिश्रम घेतले.शिवाय यासाठी एन.जी पार्क संकुल पदाधिकारी व रहिवाशी यांनी मोळाचे सहकार्य केले.हा तोरणा किल्ला पहाण्यासाठी नागरिकांकडून व स्थानिक रहिवाश्यांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.किल्ले हे महाराजांचे कर्तृत्वाचे प्रतीक आहे. यामुळे प्रत्येकांनी हा इतिहास जाणून घेतला पाहिजे. येणाऱ्या पिढीला या किल्ला बांधणीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रम सांगता येतात. किल्ला बांधणीमुळे आम्हाला महाराष्ट्रतील किल्ल्याचा अभ्यास करायला मिळतो. गेल्या  ४ वर्षांपासून आम्ही हे किल्ले बनवत आहोत असे मुलांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संदीप परब यांना राज्यस्तरीय "शिक्षण दर्पण" पुरस्कार प्रदान

मुंबई (गणेश हिरवे)  दि.०१ मे २०२४ रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र साहित्य परिषद, उल्हासनगर आणि कवयि...