आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, २५ नोव्हेंबर, २०२०

भांडुपच्या "राजाराम शेठ विद्यालय" रौप्य महोत्सव कॉफी टेबल बुक "वादळवाट" चे मा. राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन



मुंबई : 
भांडुप (पश्चिम ) मुंबई ७८ येथील सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळाचा "राजाराम शेठ विद्यालय ज्युनियर कॉलेज "चा रौप्यमहोत्सव वर्षाच्या सांगता समारंभाच्या वेळी संस्थेचे संस्थापक संचालक रमेश खानविलकर यांच्या जीवनपटावर शैक्षणिक संस्था, शाळा,- महाविद्यालये उभी करताना गेल्या पंचवीस वर्षात आलेल्या विविध संकटांवर मात करून यशस्वी झाल्यानंतर  शाळेचा रौप्यमहोत्सव सोहळ्याच्यावेळी सुप्रसिद्ध लेखिका मराठी विश्वकोशाच्या अध्यक्षा डॉ. विजया वाड लिखित नवचैतन्य प्रकाशनाचे प्रकाशक श्री. शरद मराठे यांनी "वादळवाट " पुस्तकाचे प्रकाशन केले होते.

         "वादळवाट " पुस्तकाची प्रथम आवृत्ती संपून दुसऱ्या आवृत्तीकडे वाटचाल करत असल्याने त्यावर तयार झालेल्या "वादळवाट" राजाराम शेठ विद्यालय रौप्यमहोत्सव कॉफी टेबल बुक चे प्रकाशन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवनावर मोठ्या थाटात नुकतेच पार पडले.

    याप्रसंगी राज्यपाल श्री भगतसिंह कोश्यारी यांनी रमेश खानविलकर यांच्या जीवनपटावरील "वादळवाट" पुस्तकाचे कौतुक केले तसेच सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळ राजारामशेठ विद्यालयाच्या प्रकाशित झालेल्या स्मरणिकेचे  शैक्षणिक प्रगतीबद्दल बोलताना मा. राज्यपाल श्री भगतसिंह कोश्यारी म्हणाले की

        याप्रसंगी मा. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी "वादळवाट" पुस्तक संपूर्ण पाहिल्यानंतर रमेश खानविलकर यांच्या हृदयापासून केलेल्या शैक्षणिक कार्यचा समाजासाठी उपयोग होईल त्याचं त्यांनी कौतुक केलं कोणतेही काम मनापासून आणि हृदयापासून आत्मीयतेने केलं तर ते यशस्वी होतं असही राज्यपाल महोदय म्हणाले राजाराम शेठ विद्यालय रौप्यमहोत्सव कॉफी टेबल बुक चे प्रत्येक पान आणि पान राज्यपाल महोदयांनी पाहिल्यानंतर "अतिसुंदर "या दोन शब्दात  कौतुक करून ही आठवण कायम स्वरूपी जपा असेही ते म्हणाले .तसेच त्यांनी वादळवाट कॉफी टेबल बुक्स गौरव करताना मराठी भाषेत संभाषण केले . हे विशेष ते असेही म्हणाले की संस्कृत भाषा ही देववाणी आहे आपल्या सर्वांच्या मातृभाषेचा उगमस्थान ही संस्कृत भाषा आहे.  त्यामुळे संस्कृत  भाषेचा अभ्यास  विकास सर्वांनी करणे आवश्यक आहे. भारत सरकारचे नवीन शैक्षणिक धोरण अतिशय चांगलं असून आपली संस्कृती जपण्यासाठी मातृभाषेचा विकास करण्यासाठी या शैक्षणिक धोरणाचा निश्चितपणे उपयोग होणार आहे .

               शेवटी ते असे म्हणाले की रमेश खानविलकर यांच्या जीवनपटाचे शब्दांकन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लेखिका डॉक्टर विजया वाड यांनी केल्याने त्या पुस्तकाला" अमृतवाणी" प्राप्त झालेली आहे. माझा आशीर्वाद सदैव तुम्हा सर्वांच्या पाठीशी राहील असेही ते म्हणाले. याप्रसंगी माननीय राज्यपाल महोदयांना मराठी विश्वकोश डॉक्टर विजया वाड यांनी भेट दिल्यानंतर माननीय राज्यपाल श्री भगतसिंग कोश्यारी म्हणाले की मराठी विश्वकोश म्हणजे मराठी भाषेतील खरे अमृत आहे. हे अमृत प्रत्येकाची मातृभाषा जिवंत ठेवेल मराठी विश्वकोश म्हणजे महाराष्ट्रासाठी अजरामर असे अमृत आहे. हे अमृत मला आज मिळाले मला आनंद झाला.

        या प्रसंगी सुप्रसिद्ध लेखिका डॉ. विजया वाड ,संस्थेचे संचालक संस्थापक रमेश खानविलकर, शाळेच्या मुख्याध्यापिका रश्मी खानविलकर,  संस्थेचे पदाधिकारी रिद्धेश खानविलकर हे देखील राजभवनात उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संदीप परब यांना राज्यस्तरीय "शिक्षण दर्पण" पुरस्कार प्रदान

मुंबई (गणेश हिरवे)  दि.०१ मे २०२४ रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र साहित्य परिषद, उल्हासनगर आणि कवयि...