मुंबई(शांत्ताराम गुडेकर)
सोमवार दि.२६/१०/२०२० पासून जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर येथे विक्रमगड येथील युवा प्रहार ग्रुप ने पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम उपविभाग येथे झालेल्या कामाबद्दल तसेच भ्रष्टाचाराबद्दल बेमुदत आमरण उपोषण पुकारले आहे. त्यांच्या उपोषणास देवा ग्रुप फाउंडेशन महाराष्ट्र राज्य तसेच पालघर जिल्हा यांच्या तर्फे जाहीर पाठिंबा दिला तसेच उपोषणाला बसलेल्या कार्यकर्त्यांची प्रत्यक्ष भेट घेतली व उपोषण यशस्वी व्हावे यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी देवा ग्रुप फाउंडेशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री.सुजित(पप्या भाई)ढोले, सचिव मा.श्री.तानाजी भाऊ मोरे,माजी कार्याध्यक्ष सुनील भाऊ गोरे,संघटक रवींद्र भाऊ पाटील तसेच स्वाभिमानी संघटना पालघर जिल्हाअध्यक्ष मा.श्री.जितेश(बंटी भाऊ)पाटील,प्रसाद भाई पाटील,निकेश सपाट,मनोज फोडसे,नितेश जाधव तसेच त्यांचे सहकारी व देवा ग्रुप फाउंडेशन पालघर जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सानप,उपजिल्हाध्यक्ष उमेश पाटील,संघटक संदीप पालवे,वसई तालुका उपाध्यक्ष सिद्धेश कदम,पालघर तालुका अध्यक्ष सुशांत धानवा,सचिव हरेश राऊत,मनोर विभाग प्रमुख कल्पेश दळवी तसेच इतर सदस्य पाठींबा देण्यासाठी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा