आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शनिवार, २४ ऑक्टोबर, २०२०

एक सिम्मोलंघन असंही....

मनुष्य प्राणी हा अनेक कसोटींशी झुंजत , सामना करत जीवन व्यतीत करत असतो. प्रत्येकाचे जीवन हे समस्या तसेच तणावांनी भरलेले असते.  कोणी त्यावर विचारपुर्वक व हसत खेळत पर्याय काढतात तर कोणी रडत , कुढत व आहे नशिबातच असे जीवन जगत असते. असाच एक किस्सा आवर्जून सांगावसा वाटतोय. मी त्यावेळी शाळेत शिकत होते. आमच्या शेजारी नविन भाडेकरू म्हणून रहाण्यास आले होते. त्या मावशी - काकांना तिन्ही मुलीच होत्या.  मोठी मुलगी ही दुर्दैवाने खुपच लवकर विधवा झाली होती.  सासरच्यांनी सांभाळण्यास नकार दिला म्हणून ती माहेरी रहात होती. मनावर आधीच साठलेले दुख आणि त्यात आई - वडिलांनी अनेक बंधने लादले होते. विधवा आहे म्हणुन चार लोकांत बाहेर येऊन बोलायचं नाही.  कोणत्याही कार्यक्रमास जायचे नाही.  जासत हसायचं नाही.  मोजकचं खायचं . राहणीमान एकदम साधीच ठेवायची.. अशा प्रकारची कठोर बंधनं लादली गेगेल्याने त्या बिचारीचा कोंडमारा होत होता. तिच्या पालकांनाही कळत होते. पण पदरी तीन मुली असल्याने आधीच हताश झालेले. आणि त्यात ही विधवा .. त्यामुळे ते एकदम हतबल झावेले.. थोड्या जुन्या विचारांचे होते. माझ्या आईच्या लक्षात ही सर्व परिस्थिती आली. त्या लोकांशी चांगली ओळख झाली होती.  मग सहज गप्पांच्या ओघातून आईने यावर विषय काढला. आई पुरोगामी विचारांची असल्याने तिला हे विचित्र वागवागणूक अमान्य होती. आई अगदी नम्रपणे बोलली ,' काळाने आज तिच्यावर ही परिस्थिती उद्भवली आहे.  त्यामुळे तुम्ही तिला कायम घालून पाडून बोलणं योग्य आहे का?  तुम्ही जन्मदाते . असं धिक्कारून का वागणूक का देतात.. मुलगा हा वंशाचा दिवा आहे तर मुलगी पण घराची पणती असते हे का विसरतात. तुमच्या अशा वागण्या , बोलण्याने तीची किती तळमळ होते. तिच्याशी प्रेमाने , आपुलकीने व मोकळेपणाने वागलात तर तिच्या दुखाचा भार नक्कीच हलका होईल.  स्वच्छंदी व उल्हासित राहण्यास शिकेल. ती लवकर विधवा झाली यात तिचा काय दोष.. आईने पुढे न डगमगता , निडरपणे एक मुद्दा मांडला.  तो तिच्या पुनर्विवाहाचा.. आई शांतपणे बोलली , ' आज तुम्ही सोबत आहात . पण पुढे काय ? तिने आयुष्यभर असचं एकटीने जीवन जगायचं का ? ती दिसायला सुंदर.  त्यात तरूण .. तिला पण सर्व गोष्टी करण्याचा व स्वच्छंदी विहरण्याचा पुर्ण अधिकार आहे.  तिला पुढे शिकवून योग्य जोडीदार पाहून विवाह करून द्या.  आईचे बोलणे ती मंडळी शांतपणे ऐकत होते.  त्यांनाही ते पटले. आईमुळे त्यांचे मत परिवर्तन झाले.  आई बोलल्या प्रमाणेच त्यांनी तिचे दुसरे लग्न लावून दिले.  आज ती आपल्या संसारात व मुलांमध्ये खूप समाधानी व आनंदी आहे.  खरचं आईच्या परखडपणे बोलण्याने आज एका जीवाचे कल्याण झाले. आईने फक्त पुनर्विवाह प्रवृत्त करून तिला आधार मिळवून दिला व तिच्या आई - वडिलांना पुढील चिंता पासून बचावले. 

               



-सौ.  स्नेहा मुकुंद शिंपी  
   नाशिक 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संदीप परब यांना राज्यस्तरीय "शिक्षण दर्पण" पुरस्कार प्रदान

मुंबई (गणेश हिरवे)  दि.०१ मे २०२४ रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र साहित्य परिषद, उल्हासनगर आणि कवयि...