मुंबई / बाळ पंडित - लोकमान्य टिळकांनी स्वातंत्रपूर्व काळात ज्या राष्ट्रीय एकात्मतेच्या ध्येयाने प्रेरित होऊन सार्वजनिक गणेशोत्सवाला चालना दिली त्याच सामाजिक बाधिलकीच्या ध्येयाला मंडळाने अग्रक्रमाने प्राध्यान्य दिले. हिंदू, मुस्लीम, गुजराथी, ख्रिचन, शीख अश्या नाना धर्माचे-जातीचे लोक गणेशाच्या दर्शनाला येतात व गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेतात.. पारशीवाडी मित्र मंडळाचा गणेशोत्सव मुंबईतील अग्रगण्य, नवसाला पावणारा, सामाजिक बांधीलकी जपणारा व आर्थर रोडचा राजा म्हणून सुपरिचित आहे. या वर्षी मंडळाचे गौरव चव्हाण यांच्या संकल्पनेतून पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी साधेपणात गणेश सजावट साकारली आहे.
आज मंडळाचे हे ४८ वे वर्ष असून मंडळाने कोविड १९ च्या प्रादुर्भाव असल्याने, शासनाच्या आदेशानुसार उत्सव साधेपणाने व शांततेत सुरू आहे. मंडळाने वर्गणी- देणगी जमा केली नाही.उत्सव काळात होम-हवन, कोरोना योध्याचा सत्कार करण्यात येणार आहे. मंडळ सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करीत आहे.
शेकडो पारितोषिकांचा मानकरी म्हणून पारशीवाडी मित्र मंडळाचा गणराज 'आर्थर रोड चा राजा' म्हणून परिचीत आहे. यावेळेस दानपेटीतील सर्व रक्कम आदिवासी पाड्यातील अनाथ मुलांना शिक्षणासाठी देण्यात येणार आहे.यावर्षी श्री भास्कर साळूके, (अध्यक्ष), अजित चाळके (सरचिटणीस), संकेत येरम (कार्याध्यक्ष ), परेश परब (कोषाध्यक्ष) हे पदाधिकारी आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा