आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, ३० जुलै, २०२०

एकलव्य विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून दहावी यशस्वी केली


मुंबई - (प्राजक्ता  चव्हाण)

  गेली २८ वर्षे समता विचार प्रसार संस्थेच्या वतीने, घरातील प्रतिकूल आर्थिक - सामाजिक परिस्थितीशी दोन हात करत. केवळ जिद्द, चिकाटी व मेहनत यांच्या जोरावर दहावी एस. एस. सी. परीक्षेत यश मिळवणाऱ्या आधुनिक एकलव्य विद्यार्थ्यांना एकलव्य गौरव पुरस्कार देण्यात येतो. प्रामुख्याने महापालिकेच्या माध्यमिक शाळेत शिकणारे विद्यार्थी यात असतात. घरात कुणी शिकलेलं नाही. आई - वडील मोल मजुरी करणारे. विद्यार्थ्याला दहावीच्या वर्षी ही क्लास, गाईड, पुस्तकं यांची नीट सोय नाही. अशा विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश असतो. गेल्या दोन वर्षांपासून संस्थेच्या एकलव्य सक्षमीकरण योजने अंतर्गत महापालिका माध्यमिक शाळेतल्या विद्य्यार्थ्यांना नववीत असतांनाच शाळेमार्फत संपर्क करण्यात येतो. त्या मुलांचे दर शनिवारी व रविवारी सर्व विषयांवर तज्ञ शिक्षकाचे मार्गदर्शन वर्ग घेण्यात येतात. यावर्षी कळवा येथील ठाणे महापालिका माध्यमिक शाळा क्र. २, रात्रशाळा क्र. ४९ व मानपाडा येथील शाळा क्र. ७ येथे हे वर्ग आयोजित करण्यात आले होते. या मुलांसाठी व्यक्तीमत्व विकासासाठी आय. पी. एच. संस्थेतर्फे व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. सांस्कृतिक कार्यक्रम, ईद, दिपावली संमेलन, हिरजी गोहिल, क्रिडा महोत्सव, वृक्षारोपण, अभ्यास आणि सहली या सर्व गोष्टी आयोजित केल्या गेल्या होत्या. 
  या मुलांसाठी जानेवारी महिन्यात, पास कसे व्हावे हे शिबिर घेतले गेले होते. कळवा व मानपाडा येथील शाळांप्रमाणे शाळा क्र. १८, कोपरी शाळा क्र. ३ येथेही ही शिबिरे आयोजित करण्यात आले होती. या शिबिरात व वर्षभर शिकवण्यात लतिका सु. मो., मनिषा जोशी,  हर्षलता कदम, उत्तम फलके, शैलेष मोहिले, सुप्रिया कर्णिक, चैताली कदम, सुमेधा अभ्यंकर इत्यादी शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली होती. या मुलांना बेस्ट ऑफ लक करण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात कार्यकर्त्यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या घरी भेटी दिल्या. त्यांना परिक्षेकरिता पेन भेट म्हणून देण्यात आले. 
  हाती आलेल्या निकाल माहितीनुसार, या शाळांचे निकाल अतिशय चांगले लागले आहेत. कळवा रात्र शाळेचा ८६.६ टक्के, कळवा ठा. म. पा. शाळेचा ९१ टक्के आणि मानपाडा ठा. म. पा. शाळेचा ७२ टक्के निकाल लागला आहे. काही विद्यार्थ्यांनी या परीक्षेत आपल्या कष्टाने यश मिळवले आहे.
  श्रुती रमेश केदारे या मानपाड्याच्या शाळेतील विद्यार्थिनीने ८४.८ टक्के गुण मिळाले आहेत. या विद्यार्थिनिला आई वडील नाहीत. ती आत्याकडे राहते. अत्यंत गरीब परिस्थिती. याच शाळेतील श्रुती राजू बावस्कर विद्यार्थिनीने ही ८३.४ टक्के गुण मिळवले आहेत. तिची आई घरकाम करते, वडील वॉचमनचे काम करत होते. अशा हलाखीची परिस्थितीत सुद्धा श्रुती चांगल्या टक्यांनी उत्तीर्ण झाली. जीवन राठोड या मानपाड्याच्या विद्यार्थ्याला ७९ टक्के मिळाले आहेत. त्याचे वडील पेंटर, आई घरकाम करणारी. तसेच कळवा रात्र शाळेच्या सायली विजय दळवी या विद्यार्थिनीला ही ६६.६ टक्के मिळाले. दिवसभर कालहेर येथील गारमेंट कंपनीत काम करून संध्याकाळी ही विद्यार्थी शाळेत शिकत होती. पूजा रमेश सोनवणे या कळवा ठा. म. पा. शाळेतील विद्यार्थीनीला ही आई वडील नाहीत. आजी आजोबांकडे राहत असून, आजोबा वॉचमनचे काम करतात. घरातील सर्व काम करुन तिने ६४ टक्के गुण प्राप्त केले. कळवा रात्र शाळेच्या दीपक थोरात याने दिवसभर केमिकल कंपनीत काम करून, संध्याकाळी शाळा करत ४२ टक्के गुण मिळवले. आई वडील नसल्याने मामाकडे राहून तो शिकतो होता. निशा राजा गुंजाळ या विद्यार्थिनीला सुद्धा ३७.४ टक्के मिळाले आहेत. अंजली पासवान या कळवा ठा. म. पा. शाळेतल्या विद्यार्थिनीने ४६ टक्के मिळाले. तिची आई घरकाम करते आणि वडील पेस्ट कंट्रोलचे काम करतात. अशा या सर्व विद्यार्थ्यांना खरंच मनाचा सलाम.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

फिलिप रॉड्रिग्ज यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

मुंबई (गणेश हिरवे) शिक्षक नेते शिवाजी शेंडगे आयोजित नुकताच शिक्षक स्नेहमिलन कार्यक्रम दहिसर येथील पूजा हॉल मध्ये संपन झाला.यावेळ...