मुंबई -(प्रतिनिधी )
सामान्य व्यक्तिला खाजगी रुग्णालय सेवा देत नाही.त्यांच्याबाबत तर असंख्य तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये एक प्रकारचा तणाव निर्माण झालेला आहे. राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी तातडीने लक्ष घालावे. सर्व डॉक्टरांनी नियमीत रुग्ण सुविधा द्याव्यात. यासाठी राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी लक्ष द्यावे. ज्या रुग्णालयातील डॉक्टर रुग्णांना दाखल करून उपचार करणार नाहीत त्यांची मान्यताच रद्द करून कठोर कारवाई करावी. अशी, मागणी,भारतीय माथाडी कामगार सेना संयुक्त सरचिटणीस व प्रभाग क्रमांक 114 चे शिवसेना समन्वयक अंजिक्य सिताराम भोसले यांनी केली आहे .
सदर काळात कोरोना रुग्णाला घाबरून, इतर रुग्णांकडे दुर्लक्ष करणे हे निश्चितच योग्य नाही. बिगर कोविड रुग्णांना रुग्णालयात वेळेवर दाखल करून घेतले जात नाही. त्यांच्यावर वेळेत उपचार होत नाही. औषध उपचार दिले जात नाही .अगदी हृदयविकार असलेल्या रुग्णांनाही दाखल करून घेतले जात नाही.बिगर कोविड रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचार नाकरण्यात येत आहे .ही परिस्थिती जनमानसात भीती निर्माण करणारी आहे. असे लेखी निवेदनात अजिंक्य भोसले यांनी म्हटले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा